डोक्याला जरा शांतता हवी,
आजकाल रोजच असं वाटतं |
विचारांच्या गर्दीमध्ये,
नकळत मन हरवतं ||
आपली आपली वाटणारी लोक,
नकळत दूर जातात |
जशी हातावरती रंग सोडून,
फुलपाखर हातून सुटून जातात ||
मैत्री मधला ओलावा काय,
मृगजळापरी असतो ? |
प्रत्येकाकडे कसा मग,
इथे रिता पेला असतो ? ||
घरापासून दूर,
इथे प्रत्येकाला घर आहे |
पण समाधानाने रहावं ,
असा कोणाला इथे वर आहे ? ||
एकांतात इथे ,
प्रत्येकाच्या कानगोष्टी चालतात |
मित्रांमधल्या गैरसमजाला ,
इथे तिरहाईत पुष्टि देतात ||
इतका अंतर येतं,
पण तोंड कोणी उघडत नाही |
हक्काने जाब विचारला,
म्हणून नातं कधी बिघडत नाही ||
"पण मीच का बोलू ", हे वारं,
नेमकं तेव्हाच मनी धावतं |
आणि ह्या मुर्खपणामध्ये ,
त्या तिरहाईताच फावतं ||
कुणाच्या तरी येण्याने,
आपण आपल्याच माणसांशी भांडतो |
आणि त्याच्याशी जुळवायला मगं,
का बरं तडजोड मांडतो ||
आपलं कोण परक कोण,
हे आज उमजेनास झालयं |
विश्वासाच फुल ,
आज उमलेनास झालयं ||
ह्या आजच्या अशा वळणावर,
आज खुप काही उमगलय |
आणि कुणाला किती जीव लावावा ,
हे आज आयुष्याने शिकवलय ||
-- निखिल.
Friday, November 19, 2010
Thursday, July 22, 2010
Mann
तसा मी सहसा झोपत नाही,
संध्याकाळच्या वेळी |
पण कुणास ठाउक कसा,
काल डोळा लागला कातरवेळी ||
संध्याकाळच्या वेळी |
पण कुणास ठाउक कसा,
काल डोळा लागला कातरवेळी ||
मग काय..... मनाचा तो कप्पा उघडणार,
हे तर आता सत्य होतं |
ऐकलं माझ....... तर ते मन कसलं ,
अशाच वेळी ते व्रात्य होतं ||
नको नको म्हणून सुद्धा,
ते दार त्याने उघडलच |
आणि समजून उमजून मला,
पुन्हा त्या जगात ढकलंच ||
एक - एक, एक - एक आठवण आता,
फेर धरु लागली |
आठवणीच्या जगात आता ,
मनी कळी खुलू लागली ||
बालीशच ते मन माझं....,
बेभान होउन नाचत होतं |
स्वप्नांच्या त्या धबधब्यात,
नखशिखांत भिजत होतं ||
तुझ्या स्वप्नांच्या ह्या स्पर्धेमध्ये,
माझ मन नेहमीच हरत आल आहे |
आणि एकदा तुझ्याकडे आल्यावर ते,
कधी हसत परत आल आहे ?
माझ्याकडे सुद्धा आता,
बहुदा त्याला करमत नाही |
आणि तुझ्याशिवाय दुसर्या कशात म्हणे,
त्याचे मन रमत नाही ||
म्हणत मला वेडं ते ,
की आयुष्य मला जगायच आहे |
आणि पुन्हा एकदा मला आज,
कातरवेळी झोपायच आहे ||
-- निखिल .
Saturday, April 10, 2010
Subscribe to:
Posts (Atom)




