५०० वर्षांच्या प्रतिक्षेचा, दिसेना होता अंत ।
उन वाऱ्यात तंबूमध्ये, तरी होता राघव शांत ॥
“चलो अयोध्या” घोषणेने, फुटली चळवळीस वाचा ।
कार सेवकांच्या बलिदानाने, पडला बाबरी ढाचा ॥
चढाओढ सुरू होतीच, घेण्या श्रेय लाटून ।
प्रत्येकजण तत्पर आज, घेण्या राम वाटून ॥
हिंदुत्वाचा मिरवतात, बेमालूम मुखवटा नवा ।
सनातनी विचारांची आज, दिसे सर्वत्र वानवा ॥
मर्यादापुरूषोत्तमाच्या मर्यादेचा, अखेर वनवास सुटला ।
कोर्टकचेऱ्या मागे सारून, भूमीपुजनाचा नारळ फुटला ॥
बघता बघता उभी जाहली, सुबक सुंदर वास्तू ।
त्रिलोकातूनी लाभले त्यास, मंगल वरदान तथास्तु ॥
होऊ दे मग जल्लोष आता, दणाणू दे आसमान ।
जन्मस्थळी होतायत आज, पुन्हा राघव विराजमान ॥
सजवा वाटा लावा पताका, चिंतुनी त्याचे नाम ।
एक मुखाने गरजा सारे, जय श्रीराम जय श्रीराम ॥
- निखिल.
https://www.instagram.com/reel/C2K-T1Cp867/?utm_source=ig_web_copy_link