Friday, November 19, 2010

आपली माणसं

डोक्याला जरा शांतता हवी,
              आजकाल रोजच असं वाटतं  |
विचारांच्या गर्दीमध्ये,
               नकळत मन हरवतं  ||


आपली आपली वाटणारी लोक,
           नकळत दूर जातात |
जशी हातावरती रंग सोडून,
           फुलपाखर हातून सुटून जातात ||


मैत्री मधला ओलावा काय,
        मृगजळापरी असतो ? |
प्रत्येकाकडे कसा मग,
        इथे रिता पेला असतो ? ||


घरापासून दूर,
       इथे प्रत्येकाला घर आहे |
पण समाधानाने रहावं ,
       असा कोणाला इथे वर आहे ? ||


एकांतात इथे ,
       प्रत्येकाच्या कानगोष्टी चालतात |
मित्रांमधल्या गैरसमजाला ,
        इथे तिरहाईत पुष्टि देतात ||


इतका अंतर येतं,
        पण तोंड कोणी उघडत नाही |
हक्काने जाब विचारला,
        म्हणून नातं कधी बिघडत नाही ||


"पण मीच का बोलू ", हे वारं,
         नेमकं तेव्हाच मनी धावतं |
आणि ह्या मुर्खपणामध्ये ,
         त्या तिरहाईताच फावतं ||


कुणाच्या तरी येण्याने,
        आपण  आपल्याच माणसांशी भांडतो |
आणि त्याच्याशी जुळवायला मगं,
        का बरं तडजोड मांडतो ||


आपलं कोण परक कोण,
        हे आज उमजेनास झालयं |
विश्वासाच फुल ,
        आज उमलेनास झालयं ||


ह्या आजच्या अशा वळणावर,
        आज खुप काही उमगलय |
आणि कुणाला किती जीव लावावा ,
        हे आज आयुष्याने शिकवलय ||


                                      -- निखिल.